पंचवार्षिक योजना

पंचवार्षिक योजना

eMPSCkatta Telegram Channel


1, एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे. 7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात. 


🔵 पहिली पंचवार्षिक योजना


 👉 कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

👉 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.

👉 अग्रक्रम: कृषी 

पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 

प्रकल्प : 👉

👉 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

👉 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 

👉 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 👉 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 

👉 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

👉 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

👉 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

👉 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक 

👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागु


🔵 २ री पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१

👉 प्राधान्य : जड व मुलभुत उद्योग मॉडेल : Mahalanobis Model खर्च : 👉 प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु.,  👉 वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.

👉 प्रकल्प : 

👉 १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने 

👉 २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने 

👉 ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने 

👉 ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ 

👉 ५. नानगल व रुरकेला खत कारखाने. 👉 ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला. 

👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर. 

👉 २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला. 

👉 ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले. 

👉 ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल 

👉 ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार 👉 ६. कुटुंब नियोजन 


🔵 ३ री पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९६१ - इ.स. १९६६

👉 प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)  👉 प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु.,. 👉 वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.

👉 प्रकल्प : 

👉 १. Intensive Agriculture Area programme-1964-65 

👉 २. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला).   👉३.Food Corporation of India (१९६५) 

👉 ४. १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.

👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. १९६२ चे चीन युद्ध. 

👉 २. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

👉 ३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.मूल्यमापन - तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. भारतीय अर्थव्यवस्था दीवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले .


🔵 ४ थी पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

👉 प्राधान्य : स्वावलंबन 

👉 घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ 👉 मॉडेल : Open Consistency Model खर्च : 

👉 प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु.

👉 प्रकल्प : 

👉 १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) 

👉 २. Small Farmer Development Agency (SFDA) 

👉 ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) 

👉 ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)

👉 महत्वपूर्ण घटना 

👉 १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. 

👉 २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. 

👉 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) 

👉 ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. 

👉 ६. Foreign Exchange Regulation Act-1973

👉 मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- 

१) बांगलादेश मुक्ति युद्ध १९७१ 


For more updates join our telegram channel click here : @MPSCEconomics


🔵 ५ वी पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९७४ - इ.स. १९७९.

👉 प्राधान्य : दारिद्र्य निर्मुलन 

👉 खर्च : 

👉 प्रस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु.

👉 प्रकल्प : 

👉 १. Training Rural Youth for Self Employment (TRYSEM) 

👉 २. Integrated Child Development Services 

👉 ३. Desert Development Programme

👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल राहिला. 

👉 २. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर 

👉 ३. (१९७६)मूल्यमापन : दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये 

👉 अपयशराजकीय घटना : 

👉 २५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. 

👉 २६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात. 

👉 मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले. 

👉 मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली. 

👉 १ एप्रिल १९७८ मध्ये जनता सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली. 

👉 जानेवारी १९८० मध्ये काँग्रेस ( आय ) ने सरकती योजना फेटाळली .


🔵 ६ वी पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९८० - इ.स. १९८५

👉 प्राधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती 

👉 मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model 

👉 खर्च : 

👉 प्रस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु.

👉 प्रकल्प : 

👉 १. Integrated Rural Development Programme (IRDP) 

👉 २. National Rural Employment Programme (NREP) 

👉 ३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP) 

👉 ४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA) 

👉 ५. नवीन २० कलमी कार्यक्रम 

👉 ६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश) 

👉 ७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू)

👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.

👉 मूल्यमापन 

👉 हि योजना यशस्वी ठरली .

👉 वाढीचा दर ५% पेक्षा अधिक झाला .


🔵 ७ वी पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९८५ - इ.स. १९९०

👉 प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती 👉 घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' 

👉 मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान 

👉 खर्च : 

👉 प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी 

👉 प्रकल्प : 

👉 १. इंदिरा आवास योजना-RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली. 

👉 २. Million Wells Scheme 

👉 ३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) 

👉 ४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.

👉सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.


🔵८ वी पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९९२ - इ.स. १९९७

👉 प्राधान्य : मनुष्यबळ विकास     👉 घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व 

👉 उत्पादकता' मॉडेल : Export-led Growth Model 

👉 खर्च : 

👉 प्रस्तावित खर्च- ४,३४,१२० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ४,७४,११२ कोटी रु.

👉 प्रकल्प : 

👉 १. राष्ट्रीय महिला कोष-१९९२-९३ 

👉 २. Employment Assurance Scheme (EAS) 

👉 ३. Prime Minister's Rozgar Yojana (PMRY) 

👉 ४. Mahila Samridhi Yojana 

👉 ५. Member of Parliament Local Area Development Scheme (MPLADS) 

👉 ६. NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME(NSAP) 

👉 ७. Mid-Day Meal Scheme 

👉 ८. Indira Mahila Yojana

👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 सार्वजनिक शेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूकीची प्रक्रिया सुरु झाली. १९९४-९५ मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्ण परीवातानीय करण्यात आला.

👉 (Full convertibility of Rupee on Current account) १९९२ मध्ये SEBI ला संविधानिक दर्जा देण्यात आला. 

👉 १९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेस संविधानिक दर्जा देण्यात आला .


🔵 ९ वी पंचवार्षिक योजना


👉 कालावधी: इ.स. १९९७ - इ.स. २००२

👉 प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती 👉 घोषवाक्य : सामाजिक न्याय आणि समनतेसह आर्थिक वाढ. 

👉 खर्च : 

👉 प्रस्तावित खर्च- ८,९५ ,२०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ९,४१,०४० कोटी रु.

👉 प्रकल्प : 

👉 १. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना(१५ ऑगस्ट १९९७)- स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे. 

👉 २. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना(डिसेंबर १९९७)- शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार 

👉 ३. भाग्यश्री बाल कल्याण योजना 

👉 ४. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना(१९ ऑक्टोबर १९९८)- स्त्रियांसाठी विमा संरक्षण 

👉 ५. अन्नपूर्णा रोजाना(मार्च १९९९) - पेन्शन न मिळणाऱ्या जेष्ठ नागरिकांना १० किलो अन्नधान्य पुरवठा. 

👉 ६. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना(१ एप्रिल १९९९)- IRDP, TRYSEM, DWCRA, SITRA, गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना या सहा योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. 

👉 ७. जवाहर ग्राम समृद्धी योजना(१ एप्रिल १९९९)- सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती 


🔵 १० वी पंचवार्षिक योजना


👉 कालावधी इ.स. 2002 - इ.स. 2007

👉 भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाच्या काळात ही योजना सुरू झाली. 

👉 योजनेची उद्दिष्टे 

👉 आर्थिक विकास 8 टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे. 

👉 दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण 5 टक्के ने कमी करून ते 21 टक्के वर आणणे आणि 2012 पर्यंत 10 टक्के वर आणणे. 

👉 2007 पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे. 

👉 साक्षरतेचे प्रमाण 75 टक्के पर्यंत नेणे. 👉 नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत प्रतिहजार 45 तर 2012 पर्यंत 28 पर्यंत कमी करणे. त्याचबरोबर माता मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत दोन आणि नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 

👉 2007 पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र 25 टक्के पर्यंत आणि 2002 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 👉 सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि 2012 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 

👉 2001-2011 या दशकांसाठीचा जननदक 16.2 टक्के इतका कमी करणे. 👉 दहाव्या योजनेत 7.6 टक्के इतका सरासरी विकासदर राखण्यामध्ये यश प्राप्त झाले. शेती क्षेत्राचे 4 टक्के इतका विकासदर निर्धारित केले असता फक्त 1.7 टक्के इतकाच विकासदर साध्य कऱण्यात आला. 

👉 नियोजन आयोगाने दारिद्रयरेषेखालील लोकांचे प्रमाण 2006-07 मध्ये 19.2 टक्के दर निर्धारित केले होते. परंतु राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 61 व्या फेरीतील आकडेवारीनुसार दारिद्रनिर्मूलनात फारशे यश प्राप्त करता नाही आले. 

👉 2006-07 मध्ये भारतात 29.1 अब्ज डॉलर इतकी परकीय गुंतवणुक करण्यात आली, त्यापैकी 22.1 अब्ज डॉलरची गुंतवणुक थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात होती, तर उर्वरित गुंतवणुक थेट रोख बाजारात कऱण्यात आली.


🔵 ११ वी पंचवार्षिक योजना

 

👉कालावधी : 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012

👉 योजनेला मंजूरी : 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत 11 व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली.

👉 घोषवाक्य : वेगवान आणि सर्व समावेश विकासाकडे

👉 योजनेची उद्दिष्टे : 

👉 GDP च्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले आहे.

👉 योजना खर्च : 2,70,000 कोटी

👉 मुख्य भर : सामाजिक सेवा

👉 आर्थिक वृद्धी दर : संकल्पित (9.0%)

👉 साध्य (7.9%)

👉 योजनेची दृष्टी :

👉 1. वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधीची निर्मिती होईल.

👉 2. आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेष: गरिबांसाठी

👉 3. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण.

👉 4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार.

👉 5. पर्यावरणीय शाश्वतता.

👉 6. लिंगविषयक असमानतेत घट.

👉 7. शासन प्रणालीमध्ये साधारणा इ.

👉 विकास कार्यक्रम :

👉 1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

👉 2. पंतप्रधान आदर्श ग्राम योजना (2009-20)

👉 3. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (2008)

👉 4. राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना (2008)

👉 5. केंद्रीय आम आदमी विमा योजना (2007-2008)

👉 6.राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन (2009-10) राजस्थान

👉महिला - सामाजिक योजना :

👉 1. स्वाधार (2001-2002)

👉 2. जननी सुरक्षा योजना (2005-2006)

👉 3. उज्वला (4 डिसेंबर 2007)

👉 4. सबला (19 नोव्हेंबर 2010)

👉 5. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (2010-11)

👉 6. जननी शिशु सहयोग योजना (1 जून 2011)

👉 कृषि :

👉 1. राष्ट्रीय कृषि विकास योजना (2007-08) - 25000 कोटी.

👉 2. राष्ट्रीय फळबागायत अभियान योजना.

👉 3. मेगा-फूडपार्क-शीत साखळी-खाध्यन्न प्रक्रिया उद्योगधंद्यामद्धे आकर्षित करण्यासाठी.


🔵 १२वी पंचवार्षिक योजना

 

👉 कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017

👉 12 व्या योजनेच्या दृष्टीकोण पत्राचे शीर्षक जलद, शाश्वत आणि अधिक समवेशी वृद्धी.

👉 15 सप्टेंबर, 2012 रोजी नियोजन मंडळाने 12 व्या योजनेच्या मसुदयाला मान्यता दिली.

👉 प्रमुख वैशिष्टे :

👉 1.वाढीच्या दराचे लक्ष कमी करून 8% वार्षिक सरासरी इतके ठेवण्यात आले आहे. कृषि क्षेत्र 4% तर कारखानदारी 10% इतके लक्ष ठेवण्यात आले आहे.

👉 2.योजनेचा मुख्य भर पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर असेल.

👉 3.योजनेचा आकार 47.7 लक्ष कोटी इतका असेल.

For more updates join our telegram channel click here : @MPSCEconomics

Report Page